शबनम न्युज | मुंबई
पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल, असा दावा आज विधानसभेच्या दुसऱ्या दिवशीच्या अधिवेशनात सपाचे आमदार रईस शेख यांनी केला आहे. बाहेर लोकांमध्ये फिरुन पहा, प्रचंड नाराजी आहे असंही त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले, नवे मुख्यमंत्री अल्पसंख्यांकांचे प्रश्न ऐकतील अशी आशा आहे असं सपाचे आमदार रईस शेख यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी आपण तटस्थ राहिण्यामागील कारण सांगितलं. किमान समान कार्यक्रमातील मुद्द्यांवर फारकत झाल्यानं तटस्थ राहिलो असं त्यांनी सांगितलं आहे. तसंय या बंडासाठी आपणही जबाबदार असल्याचं ते म्हणाले.
Advertisement