रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेने दिला माणुसकीचा संदेश
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
१५ ऑगस्ट १९४७ रोजी युनायटेड किंग्डमपासून देशाच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून या दिवसाचे महत्त्व आहे. याच दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ च्या तरतुदी लागू होऊन भारतीय संविधान सभेला वैधानिक सार्वभौमत्व प्राप्त झाले होते.देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अथक संघर्षातून आपला देश स्वतंत्र झाला .
तृतीय पंथी व्यक्तींना सुप्रीम कोर्टाने ‘तिसरे’ लिंग म्हणून २०१४ मध्ये मान्यता दिली परंतु आज हि तृतीय पंथीय नागरिकांना सन्मानाची वागणून जनमानसात मिळत नाही देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होऊन सुद्धा आजही अनेक घटक देश स्वतंत्र असताना देखील उपेक्षित आहे अशाच उपेक्षित घटकातील तृतीय पंथी बांधव सिद्धी कुंभार (ग्रीन मार्शल ,PCMC ,सचिव -रामा तृतीय पंथी दक्षता सामाजिक संस्था ),रितिका परमार (उपाध्यक्ष -रामा तृतीय पंथी दक्षता सामाजिक संस्था ),रिद्धी जाधव (सदस्य -रामा तृतीय पंथी दक्षता सामाजिक संस्था ) व रयत विद्यार्थी विचार मंच अध्यक्ष धम्मराज साळवे ,महासचिव संतोष शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .राष्ट्रगीत ,भारतीय संविधान प्रास्ताविक वाचन करण्यात आले यावेळी मार्गदर्शन आणि शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून करण्यात आला ,रयत विद्यार्थी विचार मंच शहराध्यक्ष मयूर जगताप ,सचिव प्रगती कोपरे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री एखादे यांनी केले , प्रास्ताविक वाचन योगेश कांबळे यांनी केले.तृतीयपंथी सदस्यांचा संविधान राज्य घटना व गुलाब पुष्प देवून सन्मान करण्यात आला.
देशाने मिळवलेल्या स्वातंत्र्याला आज ७५ वर्ष झाले हा देशातील प्रत्येक नागरिकांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या क्रांतिकारकांनी महापुरुषांनी अथक परिश्रम घेतले वेळ प्रसंगी प्राणांची आहुती दिली हे योगदान आपण कधीच आपण विसरू शकत नाही हा देश युवकांचा देश आहे या देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहण्याकरिता युवकांनी सज्ज राहायला हवे आजही या देशातील अनेक घटक शोषित पीडित वंचीत आणि उपेक्षित आहेत त्यांना स्वातंत्र्याचा उत्सव आजही करता येत नाही अशा घटकांना न्याय देण्याचं कार्य आपण सर्व भारतीय नागरिक म्हणून करायला हवे तरच देशातील प्रत्येक नागरिक स्वतंत्र नागरिक मानून सन्मानाने जगू शकेल असे मत रयत विद्यार्थी विचार मंच अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी व्यक्त केले.
आज पर्यंत नटून सिग्नल ला लोकांकडून पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी पैसे मागून उदर निर्वाह करावा लागतो स्वातंत्र्य दिन हा फक्त झेंडा वंदन पुरताच मर्यादित वाटत होता समाजात सन्मानाची अपेक्षा सोडून दिलेला आमचा तृतीय पंथी घटक आज आपल्या देशाचा ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव साजरा करत असताना आनंद होत आहे तृतीय पंथी व्यक्तींना सुप्रीम कोर्टाने ‘तिसरे’ लिंग म्हणून २०१४ मध्ये मान्यता दिली तरीही आज पर्यंत आम्ही उपेक्षित होतो महानगरपालिका आणि सामाजिक संस्थांमुळे आम्हाला आता सन्मान मिळत आहे आज रयत विद्यार्थी विचार मंच या विद्यार्थ्यांच्या संस्थेकडून आम्हाला राष्ट्र ध्वजाचे धवजरोहण करण्याचा मान मिळाला हा सन्मान आमच्या साठी प्रेरणादायी आहे असे मत तृतीय पंथी सिद्धी कुंभार (ग्रीन मार्शल ,PCMC ,सचिव -रामा तृतीय पंथी दक्षता सामाजिक संस्था ) यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास रयत विद्यार्थी विचार मंच पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे ,महासचिव संतोष शिंदे , पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मयूर जगताप ,सचिव प्रगती कोपरे ,भाग्यश्री आखाडे ,अभिजित लगाडे ,राहुल थोरात ,महेश गायकवाड ,योगेश कांबळे ,समाधान गायकवाड ,प्रमोद लोंढे तसेच रामा तृतीय पंथी दक्षता सामाजिक संस्था अध्यक्ष रामा भोरकडे ,खजिनदार निलेश पवार प्रमुख मान्यवर व इतर सदस्य पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते .