शबनम न्युज | पुणे
शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गेली २२ वर्षे उध्दवश्री पुरस्कार दिला जातो. आज त्याचे वितरण झाले. यावेळी बोलताना उपसभापती नीलम गो-हे म्हणाल्या, जे विश्वासघात करत नाहीत त्यांना पुरस्कार दिले जातात. आज ज्यांना पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी सामान्य माणसांची विश्वासर्हता कमावली आहे. त्यामुळे ते उध्दवश्री पुरस्कार प्राप्त ठरले आहेत, असे प्रतिपादन नीलम गो-हे यांनी चिंचवड येथे केले.
याप्रसंगी नीलम गो-हे बोलत होत्या. यावेळी शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचीन अहिर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेनेचे कामगार नेते इरफान सय्यद, वैभव थोरात, पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख सचिन भोसले, अनिकेत घुले आदी उपस्थित होते.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, उद्धवश्री पुरस्कार वितरण करणा-या संयोजकांचे कौतुक आहे. तसेच पिंपरी-चिंचवडची गुणवंतनगरी म्हणून नवी ओळख होत आहे. कामाची पावती म्हणजे पुरस्कार असतात. त्यातून इतरांची आपल्यावर असलेली विश्वासर्हता आजमावता येते. शिवसेना म्हणजे ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण आहे. तेच आम्ही करणार, आगामी निवडणुकांच्या कालावधीतही आपण एकजूट राहून शिवसैनिक विजयाचा धनुष्यबाण खेचून आणणार आहे.