शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील मावळ तालुक्यात पवना धरण परिसरात दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या आर्या दीपक जैन (वय १३ ) , समीर कुलदीप सक्सेना (वय ४३ दोघेही रा. वरळी, मुंबई) असे मृत व्यक्तींचे नावे आहेत.
Advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज २ सप्टेंबर २०२२ रोजी हे दोन तरुण वरळीतून मावळ तालुक्यात पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आले होते. त्यावेळी हे दोघेही पवना धरणाच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरले, पोहोत असताना धरणाच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचा मृत्यू झाला, अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.
Advertisement
Advertisement