शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरामधील थेरगाव येथील पाणीपुरवठा नियमित करा, अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, थेरगाव परिसर गेल्या काही वर्षात झपाट्याने विकसित झाला असून, रहिवाशांचे संख्येत देखील लक्षनीय वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा नियमित होणे गरजेचे असतानाही एक दिवस आड पाणीपुरवठा सुरू आहे. याबाबत सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांना कळविले असता, अधिकारी वरिष्ठांचे कारण देऊन जबाबदारी झटकून मोकळे होतात. ही बाब अत्यंत गंभीर असून, करदात्या नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची? हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. पवार नगर, पडवळ नगर, शिवतीर्थ नगर, श्रीकृष्ण कॉलनी, सुंदर कॉलनी, साईनगर, संभाजीनगर,अशोका सोसायटी, कैलास नगर, दगडू पाटील नगर, संदीप नगर, जगताप नगर, ममता, एकता, समता कॉलनी, जय मल्हार नगर, राजगुरुनगर ,ड्रायव्हर कॉलनी व इतर थेरगावातील परिसरात नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. प्रशासक या नात्याने तत्काळ संबंधितांना आदेश देऊन थेरगाव परिसरातील दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत व नियमित करण्याची सूचना आपण द्याव्यात, असे मनीषा पवार यांनी नमूद केले आहे.