शबनम न्युज | मुंबई
जेव्हा पासून खोके सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसलेत तेव्हापासून महाराष्ट्रात पनवती सुरू झाली आहे. आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना गुवाहाटीला जाण्याची गरज पडली, पण मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय. माझा आत्मविश्वासच तुम्ही आहात, मी जिंकणार म्हणजे जिंकणारच. असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असतो तर तुमच्यावर आत्महत्येची वेळ येऊ दिली नसती. शिवसेना जिवंत सळसळत रक्त आहे. कितीही फोडा तुम्हाला शक्य होणार नाही, तुम्हाला डोके आपटावं लागतील पण माझी शिवसेना तुम्हाला फोडल्याशिवाय राहणार नाही. निवडणुका लांब mत चालल्या आहेत, मी तुमच्या भरवशावर उभा आहे. मी तुमच्या संकटकाळी उभा आहे आत्महत्या करायची नाही, आपण शिवरायांचे नाव घेतो मग शिवरायांनी तर आपल्याला लढायला शिकवलय.
जेव्हापासून हे खोके सरकार आलंय तेव्हापासून महाराष्ट्रात पणवती सुरू झाली आहे. उद्योगधंदे तिकडे गेले तर बेरोजगारी वाढेल, तरुणांना बेकार ठेवायचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून आदर्श मोडायचा, सोलापूर कर्नाटकात गेल्यानंतर माझा पंढरपूरचा विठोबाही कर्नाटकात जाणार. लाखो कोट्यवधी भाविक विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी कर्नाटकात जाणार. महाराष्ट्रातलं दैवत पंढरपूर, अक्कलकोट पळवणार असा आरोप उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.