शबनम न्युज | नागपूर
राज्यातील साखर कारखान्यांना ऊसतोड मजूर पुरवणाऱ्या कंत्राटदार-मुकादमांकडून साखर कारखान्यांची, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची, ट्रॅक्टर खरेदी करुन वाहतूक सुविधा पुरवणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार व शेतकऱ्यांच्या मुलांची होत असलेल्या फसवणूकीसंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधले.
दरम्यान, सहकारमंत्री अतुल सावे यांनी यासंदर्भात बैठक घेऊन गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामकार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
हिवाळी अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी आजही लावून धरली. अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.