शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील अक्षय भुमकर माने या युवकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पिंपरी-चिंचवड शहराच्या शर्मिला येवले (बाळासाहेबांची शिवसेना) यांनी थेट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे. अक्षय ने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांना वारंवार त्यांनी पत्रव्यवहार केला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शर्मिला येवले म्हणाल्या कि, बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील अक्षय भुमकर माने या युवकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बातमी आज प्रसार माध्यमांमधून समोर आली. हीच का खरी आदित्यजींची युवा सेना जी सामान्य कार्यकर्त्यांना आत्महत्या प्रवृत्त करते. नेता हा सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांचे अडचणी जाणून समजून घेणार असतो. आदित्य ठाकरे यांना वारंवार त्यांनी पत्रव्यवहार करूनही त्याची दखल वरिष्ठांनी घेतली नाही. ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते सामान्य कार्यकर्त्यांचा आर्थिक व्यवहारात वापर करताना दिसून येत आहेत ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे आणि यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि अक्षय माने यांना आत्महत्यास प्रवृत्त करण्यामागे ज्या ज्या लोकांचा हात आहे त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि अक्षय माने हा प्राथमिक स्वरूपातील पदाधिकारी देखील असू शकतो कारण असे असंख्य पदाधिकारी ह्या सगळ्या त्रासातून जात आहेत परंतु वरिष्ठ नेत्यांचा अजिबात यावर लक्ष नसल्याचं दिसून येत.