शबनम न्युज | पुणे
भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी-20 सामना महाराष्ट्रातील पुण्यात शहरात खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी ऋतुराज गायकवाड किंवा राहुल त्रिपाठी यांच्यापैकी एकाला संधी दिली जाऊ शकते आणि त्यांचे आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहता कोणाला संधी द्यायची याबाबत हार्दिक पांड्या विचारात पडला आहे.
लवकरच पुण्यात भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना होणार आहे. आता संजू च्या जागी कोणाला संधी मिळते ही पाहण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. संजूकडे मधल्या फळीच्या फलंदाजीची जबाबदारी आहे. ऋतुराज ओपनिंग साठी ओळखला जातो, तर राहुल त्रिपाठी मधल्या फळीत फलंदाजी करतो, अशा परिस्थितीत राहुल प्लेइंग इलेव्हन मध्ये दिसू शकतो. मात्र दोन्ही फलंदाजांची आकडेवारी पाहता राहुल पेक्षा ऋतुराजचे पारडे जड आहे.
राहुलने अद्याप ही टीम इंडियासाठी एकाही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-ट्वेंटी सामना खेळलेला नाही, तर ऋतुराज ने टीम इंडियासाठी 8 ट्वेंटी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि त्याने 135 धावा केल्या आहेत, त्याने आयपीएलच्या 36 सामन्यात 1207 धावा केल्या आहेत, तर राहुलने आयपीएलच्या 74 धावांमध्ये 27.66 सरासरीने 1798 धावा केल्या आहेत.