शबनम न्यूज: पिंपरी चिंचवड :प्रतिनिधी:
पुणे स्टेशन व यार्ड रिमोल्डींग च्या कामामुळे लोनावळा येथून सुटणा-या लोकल शिवाजीनगर पर्यत चालविल्या प्रवाशांच्या होणा-या गैरसोय टाळण्यासाठी लांब पल्ल्यांच्या गाड्यांना चिंचवड स्थानकात थांबा देणे बाबत मागणीचे पत्र आज डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर श्रीमती इंदू दुबे यांना निवेदन केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीच्या वतीने देण्यात आले यावेळी केंद्रीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य बशीर सुतार, सिनी. डीसीएम श्री. मिलिंद हिरवे साहेब आणि सोबत सर्व सन्माननीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य उपस्थित होते दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,
पुणे येथील यार्ड रिमोल्डींगचे काम सुरू करण्यात आले असून, या कारणामुळे लोनावळा येथून सुटणा-या काही लोकल शिवाजीनगर स्थानका पर्यंतच चालविण्यात येत आहेत. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार असून, त्यांना लांब पल्ल्यांच्या गाड्या पकडण्याकरिता आपल्या प्रवासी सामानासह सर्व बोजा घेऊन शिवाजीनगर येथून पुन्हा खासगी वाहनांने पुणे स्थानक येथे जावे लागत आहे. यामुळे जेष्ठ नागरिक, लहान मुले, महिला, आजारी, अपंग व्यक्ती यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात हाल होत असून, पुन्हा परतीच्या प्रवायामध्ये देखील त्यांना आपल्या प्रवासी सामानासह सर्व बोजा घेऊन पुन्हा शिवाजीनगर येथे खासगी वाहनाने येऊन लोकल पकडावी लागत आहे. यामुळे प्रवाशांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊन, त्यांना आर्थिक भुर्दड बसत आहे. तसेच त्यांना गाडीच्या वेळेपूर्वी किमान दोन ते तीन तास आधी घरातून बाहेर पडावे लागत आहे.
पुणे ते लोनावळा हे अंतर जवळपास 65 किमी असून या दोन स्थानकाच्या दरम्यान लांब पल्ल्यांच्या गाड्या कुठेही थांबत नाहीत, पुणे ते लोनावळा दरम्यान चे मध्यवर्ती स्टेशन म्हणून आपण चिंचवड स्थानकाच्या विचार केल्यास येथे किमान 40 लाखांच्या आसपास नागरिक राहत असून, मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग राहतो आहे. यातील बहुतांश कामगार वर्ग हा परराज्यातील असून त्यांना आपल्या गावी परत जाणार होते जाण्याकरिता किंवा परत येण्याकरिता दररोज हजारो प्रवासी या स्थानकातून मोठ्या प्रमाणावर प्रवास करत आहेत. लांब पल्ल्यांच्या गाड्या पकडण्याकरिता त्यांना पुणे किवा लोनावळा स्थानकात जावे लागते. यार्ड रिमोल्डींग चे काम पुर्ण होण्यास किमान एक ते दीड वर्षाचा कालावधी लागणार असून, पुढील काळात आणखी काही लोकल या शिवाजीनगर पर्यंतच चालविल्या जाणार आहेत. यामुळे या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई वरून सुटणा-या व मुंबई कडे जाणा-या सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्यांना चिंचवड या मध्यवर्ती ठिकाणी थांबे देण्यात यावेत. यामुळे प्रथमतः पुणे स्थानकावर प्रवाशांची गर्दीमुळे येणारा ताण कमी होऊन रेल्वे प्रशासनास प्रवाशांच्या सुरक्षिततेते बाबतचे योग्य नियोजन करता येईल. तसेच या प्रवाशांना शिवाजी नगर येथे उतरून किवा परत शिवाजीनगर येथे येऊन गाडी पकडण्याकरिता जो द्रविडी प्राणायाम करावा लागत आहे किंवा करावा लागणार आहे तो कमी होऊन प्रवाशांना होणारा मानसिक मनस्ताप कमी होऊन, त्यांच्या वेळेची व पैशांची मोठ्या प्रमाणावर बचत होऊन त्यांना एक सुखकर, आराम दायक रेल्वे प्रवास व चांगली सुविधा उपलब्ध करून देता येईल.
तरी आमची आपणांस नम्रपुर्वक विनंती आहे की, पुढील काही महिने हे सुट्टीच्या कालावधीचे असून मोठ्या प्रमाणावर प्रवासी लांब पल्ल्यांचा प्रवास करणार असून, वरील बाबीचा विचार करता मुंबई येथून सुटणा-या व मुंबई कडे जाणा-या सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्यांना चिंचवड स्थानकात थांबा देण्यात येऊन प्रवाशांकरिता एक चांगली सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केंद्र रेल्वे सल्लागार समितीच्या वतीने डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर श्रीमती इंदू दुबे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली