शबनम न्यूज पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
पिंपरी प्रतिनिधी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले होते कि मोरेवस्ती भागात आजपासुन म्हणजेच 12 एप्रिल पासुन सकाळी दहा ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.परंतु हि वेळ प्रभागातील नागरिकांच्या कामाच्या दृष्टीने सोयीची नाही असे मत सामाजिक कार्यकर्ते मनोज जरे यांनी सांगितले. आहे
चिखली मधील सामजिक कार्यकर्ते श्री.मनोज जरे यांच्यावतीने पालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी यांना भेटुन याबाबत निवेदन दिले दिलेल्या निवेदनात मनोज जरे यांनी नमूद केले की मोरेवस्ती मध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे आणि बहुतांश घरातील महिला भगिनी सुद्धा कुटुंबाला हातभार लागावा यासाठी कामाला जात असतात.जर आपण सकाळी दहा वाजता पाणी पुरवठा केलात तर नागरिकांना पाणी भरण्यासाठी कामावरुन सुट्टी घ्यावी लागेल आणि हे नक्कीच नागरिकांच्या हिताचे नाही.त्यामुळे आमच्या मोरेवस्ती मध्ये आहे त्या वेळेत संपूर्ण प्रेशर ने पाणीपुरवठा करावा अन्यथा सकाळी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर पाणीपुरवठा करावा अशी विनंती मनोज जरे यांनी अधिकाऱ्यांना केली.
यावर बोलताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी यांनी काही तांत्रिक बाबी सांगितल्या कि मोरेवस्ती व म्हेत्रेवस्ती भागात वाढत्या लोकसंख्येमुळे व पुढील महिण्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी पाणी सोडण्याच्या वेळेत बदल करावा लागला आहे.हा बदल येणाऱ्या पंधरा दिवसांसाठी असेल कारण भामा-आसखेड चे पाणी येत्या पंधरा दिवसात चिखलीतील पाटीलनगर भागात चालु होईल तेव्हा तो शिल्लक राहणारा पाणीसाठा आपण मोरेवस्ती व म्हेत्रेवस्ती भागासाठी वापरू शकतो.त्यामुळे जास्तीत जास्त एप्रिल महिना संपेपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे अशी भुमिका अधिकाऱ्यांनी मांडली.
परंतु या पंधरा दिवसात आमच्या नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याने आता आहे त्याच वेळेत पुढील पंधरा दिवस पाणीपुरवठा करावा व चिखली मध्ये जेव्हा भामा आसखेड चे पाणी चालु होईल तेव्हा मोरेवस्ती साठी स्वतंत्र मात्र सकाळच्या वेळेतच पाणीपुरवठा करावा हि विनंती मनोज जरे यांनी केली.
मनोज जरे यांनी मांडलेल्या मुद्यांवर अधिकारी वर्गातुन सकारात्मक प्रतिसाद आला व मुख्य अभियंत्यांशी मोरेवस्ती मधील समस्येबाबत चर्चा करून आहे त्या वेळेतच पाणीपुरवठा करण्यासंबंधीची विनंती करू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.