आपण कामात व्यस्त असल्यामुळे बऱ्याचवेळा घरी, परिवाराकडे लक्ष देता येत नाही. तसेच वेळ ही देता येत नाही. त्यामुळे कामात व्यस्त असल्याने आपल्या मागे असणारी आपल्या घरच्यांची काळजी आपल्याला भासत नसते. मात्र आपला परिवार विशेषतः आई, वडील, भाऊ, बहीण आणि आयुष्यात आई वडिलांसारखेच काळजी करणारी किंवा करणारा, नेहमी खंबीर पाठीशी उभा राहणारी/राहणारा, अशी बायको किंवा नवरा यांची काळजी, आपल्याला कळत ही नसते. असेच एक उदाहरण म्हणजे एका प्रसिद्ध कलाकाराने आपल्या सोशल मीडिया वर आपल्या प्रिय बायको साठी भल्यामोठ्या शब्दांत एक प्रेमपत्र लिहलं आहे. यावेळेस अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. तसेच ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत इंद्राच्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता ऋतुराज फडके यानेही २७ जानेवारीला लग्नगाठ बांधली. प्रीती असं त्याच्या पत्नीचे नाव आहे. कामात व्यस्त राहिल्याने, बायकोला वेळ न देता आल्याने, तिच्याशी गप्पा मारता न आल्याने ऋतुराजने एक प्रेमपत्र तिच्यासाठी लिहिले आहे.
ऋतुराज आपल्या पत्रात लिहतो कि,
प्रिय बायको.. गेले अनेक दिवस मी दोन मालिकांचे शूटींग करत असल्यामुळे भेट होत नाही, शूटींगचा सेट माझ्या घरापासून २.३० तास अंतरावर असल्यामुळे, माझे रोजचे १७ तास शूटींग आणि प्रवासात जातात, त्यामुळे गेले काही दिवस प्रत्यक्ष भेटून एकमेकांशी गप्पाच झाल्या नाहीत.. काल बाहेर ४१ डिग्री तापमान होतं आणि मी out door ला शूटींग करत होतो, फाईट सिक्वेन्स करत होतो, दिवसभर हे सुरू होतं. ऊन प्रचंड असल्यामुळे प्रोडक्शने विशेष काळजी घेतली होती. (लिंबू पाणी, थंड पाणी, पंखे,) तरी त्रास होत होता.. ४१ डिग्री मध्ये जमिनीवर अनवाणी पायाने मला धावा धाव करायची होती. तळपत्या उन्हात पाय ठेवणं म्हणजे जळत्या कोळशावरती पाय ठेवल्या सारख वाटत होतं, सकाळी ७ वाजेपासून सुरु झालं ते संध्याकाळी ५.३० वाजता संपलं, घरी आलो माझा थकलेला चेहरा बघुन आईनी डोक्याला तेल लाऊन दिलं, गरम गरम चहा दिला, खूप थकलो असल्यामुळे थोड्याच वेळ गप्पा मारून झोपलो, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी शूटींगला जायचं होतं, मला झोप लागली, साधारण मध्यरात्री माझ्या पायाला कोणीतरी काही तरी करतंय हे जाणवलं, मी जागा झालो तर, माझी बायको माझ्या तळपायाला “कैलास जीवन” लावत होती. कारण उन्हात पळून माझ्या पायाला बऱ्यापैकी दुखापत झाली होती, मी घरी सांगितलं नव्हतं, जे घरातल्या घरात मी चालत होतो, त्या वरून माझ्या बायकोला जाणीव झाली होती, की ह्याला त्रास होतोय, तिने ३ ते ४ वेळा विचारलं सुद्धा पायाला तेल किंव्हा क्रीम लाऊन देऊ का? मी म्हटल नको नंतर मी लावीन आणि हे बोलून मी गाढ झोपून गेलो, तर मध्य रात्री तू माझ्या पायाला कैलास जीवन लावत होतीस, ह्या आणि अश्या बऱ्या गोष्टी आहेत ज्या माझ्या साठी तू न सांगता करतेस, आपलं लग्न होण्याच्या आधी ४ वर्ष रिलेशनमध्ये होतो, तेव्हा सुद्धा अश्या बऱ्याच गोष्टी तू माझ्या साठी केल्या आहेस, काल म्हणजे तू जे केलं आहे ते म्हणजे खरंच.. माझ्याकडे शब्द नाहीत.. माझं खरच भाग्य आहे की, तुझ्या सारखी बायको, मैत्रीण माझ्या आयुष्यात आहे, तू मला जो सपोर्ट करतेस, ज्या प्रकारे माझ्या मागे खंबीरपणे उभी राहते आहेस, त्यामुळे मी इतका पळू शकतो आहे..तुला मला thank you म्हणायचं नाहीये कारण ते तुला आवडणार नाही.. पण सगळ्यांन समोर i love you नक्कीच म्हणीन.” (आपली माणसं आपल्यासाठी नकळत खूप काही करत असतात आपण परतफेड नाही करू शकत किमान आपण त्याच्या बद्दल दोन शब्द लिहू नक्कीच शकतो), अशी पोस्ट ऋतुराजने केली.
ऋतुराजच्या या प्रेमपत्राचा त्याची पत्नी प्रितीने देखील उत्तर दिले आहे. तिने त्याच्या या पोस्ट ला कमेंट केले आहे. “तुझ्या इतकं छान मन मोकळे पणाने मला लिहिता येणार नाही पण इतकच म्हणेन की मी आयुष्यभर तुझ्या मागे खंबीर पणे उभी असेन.. Love you too” अशी कमेंट प्रितीने केली आहे.