शबनम न्युज | मुंबई
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरू असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. याबाबत पत्रकारांनी शरद पवार यांना याबाबत प्रश्न विचारला, त्यावर शरद पवार यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं आहे.
“मला काही माहिती नाही. मुख्यमंत्री बदलायचा निकाल आम्हाला सांगायचं कोणाला कारण नाही. असं काही आहे असं माझ्या कानावरही नाही. हे राऊतांचं स्टेटमेंट असलं तरी ते पत्रकार आहेत ते तुम्हा पत्रकार लोकांना अधिक माहिती असते.” असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले.
दरम्यान, मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नुकतेच एका कार्यक्रमात केले होते. त्यावरून मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा सुरू झाली. तसेच “दिल्लीत मुख्यमंत्री बदलाच्या हाचलाची सुरू आहेत”, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यावरून महाराष्ट्रातील राजकारणात बरीच चर्चा रंगली. या पार्श्वभूमीवर शरद पवारांची भूमिका काय आहे, असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. त्यावर आज शरद पवारांनी थोडक्यात उत्तरे देऊन प्रश्नांना पूर्णविराम दिला आहे.