शबनम न्युज | मुंबई
दिल्लीमध्ये अनेक भेटीगाठी घेणार आहेत, त्यात जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनाही भेटणार आहे. पुलवामा बाबत त्यांनी जे काही खुलासे केले आहेत, ते राष्ट्रीय सुरक्षाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. तो संपूर्ण विषय देशात पोहोचवू नये, यासाठी माध्यमावर दबाव आणण्यात आला. पुलवामा हत्याकांडात काही गडबड असेल तर तो विषय वेगळ्या पद्धतीने जास्तीत जास्त देशात जायला हवा, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.
पुलवामा हल्ल्याबाबत जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अलीकडेच एक मोठा गौप्प्यस्पोट करून खळबळ उडून दिली होती. यावर विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यातील महाविकास आघाडीचे नेत्यांनी ही भाजप आणि मोदी सरकारवर निशाणा साधला.
राऊत पुढे म्हणाले, सत्यपाल मलिक हे महत्त्वाचे नेते आहेत. ते सध्या सक्रिय आहेत, देशाच्या पुढील राजकारणात त्यांची काय मदत होऊ शकते हे समजून घेणे आवश्यक आहे. आमचा आणि त्यांचा संवाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे दिल्लीत त्यांना भेटणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.