शबनम न्युज | मुंबई
नवाब मलिक जे सातत्याने म्हणत होते, ते आता कसे खरे होत आहे बघा. हे दुर्दैवी असून, मी नक्कीच हा विषय संसदेत मांडणार आहे. शाहरुख खान सारख्या मोठ्या फिल्मस्टारच्या मुलाचे असे खोटे हाल होऊ शकतात, तर या देशात सर्वसामान्य माय-बाप जनतेच्या पोरांनी काय करावे? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
आर्यन खान ड्रुग्स प्रकरणामुळे सीबीआय चौकशी सुरू असलेले एनसीबी चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण देण्याचा निर्णय कोर्टाने कायम ठेवला. या प्रकरणी पुढील सुनावणी 8 जूनला होणार आहे. त्यामुळे 8 तारखेपर्यंत समीर वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या यंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून नवाब मलिक जे बोलत होते ते खरे होते असेही म्हटले आहे.
त्या म्हणाल्या, समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला होता. त्यावेळी त्यांना आजपर्यंत म्हणजेच, २२ मे पर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे आज त्यांच्या अटकेबाबतच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यात कोर्टाने अटकेपासून संरक्षणाचा निर्णय कायम ठेवला असून पुढील सुनावणी ८ जूनला होणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक यांच्यात चांगलीच जुंपली होती. माध्यमांनीही तो विषय चव्हाट्यावर आणला होता. आता, याप्रकरणी नवाब मलिक तेव्हा जे सांगत होते तेच खरं होतं, असे सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.