शबनम न्यूज प्रतिनिधी
दौंड-दौंड तालुक्यातील दहिटणे येथील रहिवासी रवींद्र ज्ञानेश्वर लगड यांनी दिलेल्या माहितीनुसार 9 जून रोजी रात्री त्यांची नदीवरील वैयक्तिक मोटार चोराने चोरून नेली त्या संदर्भात यवत पोलीस स्टेशन येथे रवींद्र लगड गेले असता पोलिसांनी तक्रार न घेता त्यांना बसवून ठेवले व तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. दौंड चे डी वाय एस पी यांनी सांगूनही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही व ज्या चोरांनी मोटार चोरून नेली त्यांचे संबंध तेथील स्थानिक आमदारांशी असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे पोलिसांमध्ये कोणीही तक्रार घेत नाही अशी आपली तक्रार रवींद्र ज्ञानेश्वर लगड यांनी प्रसिद्धी माध्यमांमध्ये दिली आहे.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे नमूद केले आहे की त्यांनी हा सर्व प्रकार पोलीस पाटील यांनाही सांगितला पोलीस पाटील यांनी सर्व माहिती घेतली व परिसराची पाहणी केली परंतु मोटर चोरणाऱ्यांवर अद्यापही कोणती हि कारवाई झालेली नाही.
याबाबत लगड यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडेही तक्रार केली असून आपल्याला न्याय मिळावा यासाठी त्यांनी निवेदने दिली आहेत. तसेच चोरट्यांवर कारवाई व्हावी न्याय मिळावा चोरट्यांविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल करून घ्यावी अशी मागणी लगड यांनी केली आहे.