शबनम न्यूज, प्रतिनिधी ;
माथाडी कामगार यांना आर्थिक पाठबळ देऊन आर्थिकदुष्ट्या सक्षमीकरणाचे काम करणाऱ्या माथाड़ी कामगार सहकारी पतसंस्थेचे सहकार मध्ये काम उल्लेखनीय असल्याचे मत कामगार नेते इरफान सय्यद यांनी व्यक्त केले.
रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्था आणि मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्था यांची वार्षिक सर्व साधारण सभा नुकतीच खंडोबा संस्कृतिक भवन, खंडोबा माळ, आकुर्डी या ठिकाणी उत्साहात पार पडली.सभेच्या अध्यक्षस्थानी इरफान सय्यद होते. यावेळी रायरेश्वर माथाड़ी कामगार सहकारी पतसंस्था (30वी सभा )
उपाध्यक्ष : रोहित नवले,सचिव सतीश कंठाळे, खजिनदार विजय खंडागळे,संचालक भिवाजी वाटेकर, न्यानेश्वर घनवट, न्यानेश्वर औताडे, पाराजी व्यवहारे, प्रकाश चोरे, सुभाष पुजारी, पुष्पा काळे, ललिता सावंत व्यवस्थापक प्रकाश पवार यांनी अहवालाचे वाचन केले. तर मातोश्री माथाड़ी कामगार सहकारी पतसंस्था(26 वी सभा) अध्यक्ष : पांडुरंग कदम,उपाध्यक्ष बबन काळे,सचिव उद्धव सरोदे,खजिनदार सर्जेराव कचरे,संचालक गोरक्ष दुबाले, बाबासाहेब पोते, अशोक साळुंके, न्यानदेव पाचपुते, समर्थ नाईकवडे, विठ्ठल इंगळे, चंद्रकांत पिंगट व समस्त कामगार वर्ग उपस्थित होते व्यवस्थापक,धर्मराज कदम यांनी अहवालाचे वाचन केले
रायरेश्वर व मातोश्री माथाडी कामगार पथसंस्थाचे मार्गदर्शक / सल्लागार शिवसेना उपनेते इरफ़ानभाई सय्यद., शिवसेना महिला आघाडी नेत्या सुलभाताई उबाळे, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे कार्याध्यक्ष परेश मोरे, जन. सेक्रेटरी प्रवीण जाधव, नागेश व्हनवटे, ब्लु स्टार लॉजिस्टिकस कंपनीचे संचालक प्रभाकरजी गुरव साहेब, तसेच सर्व सभासद कामगार व कुटुंबीय उपस्थित होते.
इरफानभाई सय्यद पुढे म्हणाले की , पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिकनगरी आहे. येथे असंघटित क्षेत्रातील कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यात प्रामुख्याने माथाडी कामगार यांचा उल्लेख करावा लागेल. या माथाडी कामगाराला स्वतःच्या पायावर उभे करायला तसेच त्याला आर्थिकसक्षम करण्यात मातोश्री व रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्था यांचे योगदान कार्य उल्लेखनीय आहे. सहकारात अनेक बँका पतसंस्था मोठ्या संख्येने आहेत. पण, या सर्वात कामगारांच्या आर्थिक विकासासाठी त्यांना पाठबळ देण्याची मानसिकता दिसून येत नाही, म्हणून कारखान्यात कामगार सोसायटी निर्माण झाल्या. पण, त्यात कायम आणि संघटित कामगार यांचा सहभाग जास्त होता व आहे .असंघटित क्षेत्रातील माथाडी कामगार यांच्या करिता 30 वर्षापूर्वी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि आज सन 2022-23 मध्ये दोन्ही पतसंस्था मिळून जवळपास 35 कोटीचा आर्थिक व्यवहार या पतसंस्थेत केला जातो ही खूपच उल्लेखनीय बाब आहे. सभासद कामगार यांच्या कुटुंबातील लग्न , समारंभ विविध कार्यक्रम याकरिता महारष्ट्र मजदुर संघटना व पतसंस्था यांच्या वतीने लवकरच एक सुनियोजित हॉल करण्यात येईल. सरकारने शासन आदेश काढून पतसंस्था मोडीत काढण्याचा जो डाव अखला होता. त्यावेळी महारष्ट्र मजदुर संघटना यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन कायदेशीर मार्गाने हा अध्यादेश मागे घेण्यास लढा दिला.हा सहकारातील हा असंघटित कामगार यांच्या करिता उभा केलेला हा वृक्ष असच खूप मोठा व्हावा अशा शब्दात कामगार नेते इरफान सय्यद यांनी पतसंस्थेचे कार्यकारी मंडळ व सभासद कामगार यांना शुभेच्छा देऊन संबोधित केले.
मातोश्री कामगार पतसंस्था यांचे एकूण भाग भांडवल 7 कोटी 22लाख असून जवळपास सुमारे 13 कोटी 60 लाख कर्ज वाटप यांनी केले आहे.रायरेश्वर माथाड़ी कामगार पतसंस्था यांचे एकूण भाग भांडवल 6 कोटी 16 लाख असून जवळपास सुमारे 9 कोटी 50 लाख कर्ज वाटप यांनी केले आहे. बदलत्या काळानुसार सुसज्ज संगणक प्रणाली , एस एम एस बँकिंग प्रिंटिंग पासबुक अशा आधुनिक सुविधा हे सभासद यांना पुरवतात.
सर्वसाधारण सभेत सामाजिक सहकार कामगार क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या मृत पावलेले सभासद , कार्यकर्ते , पतसंस्थेचे सभासद यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संस्थेचे खजिनदार / संचालक सर्जेराव कचरे यांनी केले.