शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड : आई-वडिलांच्या कुशीत जाते तेच खरे बालपण; परंतु कित्येक बालकांच्या नशिबी असे बालपण येतच नाही. रस्त्याच्या कोपऱ्यावर फेकून दिलेल्या या निष्पाप कोवळ्या जीवाला मग कुठल्या तरी अनाथाश्रमात स्थान मिळते. तेच त्याचे कुटुंब बनते. अशा अनाथ मुलांना आई-वडिलांच्या प्रेमाची उणीव भासणार नाही, अशा पद्धतीने लळा लावून त्यांचे संगोपन करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. अशाच संस्थांमध्ये दिघी गावातील मातृछाया बालकाश्रम संस्थेचा समावेश करता येईल. समाजाप्रति आपलेही काही देणे लागते, या विचाराने प्रेरित होऊन डी. एच. एल. एक्सप्रेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. पुणे या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून व व्यवस्थापन यांच्याकडून या मुलांना छोटीशी भेट म्हणून रोजच्या गरजेच्या लागणाऱ्या वस्तु देण्यात आल्या, तसेच त्यांच्यासोबत वेळ घालवून गप्पा मारण्यात आल्या तसेच त्यांची करमणूक म्हणून त्यांच्यासोबत मनोरंजक खेळ खेळण्यात आले.
या कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल डी. एच. एल. एक्सप्रेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. पुणे या कंपनीच्या कर्मचारी आणि व्यवस्थापन तसेच मातृछाया बालकाश्रम संस्थेच्या मंडळाचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.व्यक्त करण्यात आले.