शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड : दिवाळी म्हटलं की जसे फराळ आले तसे मातीचे किल्ले बनविणेही आलेच. महाराष्ट्र हि किल्ल्यांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सरदारांच्या शौर्याच्या कथा याच गडकिल्ल्यांवर घडल्या,याच शौर्याची ओळख मुलांना व्हावी व महाराजांचे गडकिल्ले हे पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी श्री साई चौक मित्र मंडळ (इंद्रायणी नगर ) व श्री विलास मडिगेरी प्रतिष्टान वतीने किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती माजी नगर सेवक विलास मडिगेरी यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे दिली आहे.
लहान मुलांवर इतिहासाचा संस्कार व्हावा , आपण ज्या प्रदेशात राहतो तिथला इतिहास कसा घडला भूगोल कसा आहे या गोष्टी लहानपणापासून मुलांना समजल्या तर त्यांची सामाजिक जडणघडण नक्कीच चांगल्या वळणाने होते . अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शिवरायांच्या या भूमीत हा उपक्रम झालाच पाहिजे या आग्रहाने गेल्या दोन वर्षा पासून ह्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे हि या वेळी मडिगेरी यांनी सांगितले आहे.
मागील दोन वर्षे खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या वर्षी देखील त्याच उत्साहाने श्री साई चौक मित्र मंडळ, श्री विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान व श्री वैष्णोवमाता मंदिर समिती ने यास्पर्धेचे आयोजन केले आहे.
सदर किल्ले ( दुर्ग ) बनवा स्पर्धा २०२३ ” गुरूवार, दिनांक ०९ / ११ / २०२३ ते शनिवार दिनांक ११ / ११ /२०२३ रोजी होत आहे .
मुलांना पालकांनी किल्ले बनवण्यासाठी प्रोत्साहित करावे , मार्गदर्शन करावे असे आवाहन नगर सेवक विलास मडिगेरी यांनी केले आहे.