शबनम न्यूज , प्रतिनिधी :
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय,डुडूळगाव, आळंदी, पुणे’ या ठिकाणी अर्थशास्त्र विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ” स्पर्धा परीक्षा तंत्र आणि मंत्र ” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन व स्वागत गीताने झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.कैलास अस्तरकर यांनी कार्यक्रमा मागची भूमिका, उद्देश या संदर्भात माहिती देऊन आजच्या काळात स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व टिकवण्याची आवश्यकता स्पष्ट केली. या वेळी सौ.स्वाती दिगंबर इंगळे प्रकाशित मातृरक्षा दिवाळी अंकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ हंसराज थोरात यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक प्रा.दिगंबर इंगळे- युनिक अकॅडमी पुणे, यांनी “बसला कशाला आळशी बनायला” चाल पुढे देशाचे काम करायला” या काव्यपंक्तीने महाविद्यालयीन तरुणांमध्ये आळस घालवण्याचे तंत्र विविध उदाहरणाचे दाखले देत स्पष्ट केले. ” स्पर्धा परीक्षा तंत्र आणि मंत्र ” या विषयाला न्याय देतांना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये ध्येय निश्चिती, सतत अभ्यास,वर्तमानपत्रे वाचणे, तसेच मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व निर्माण करणे स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना कसे महत्वाचे आहे या संदर्भात मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर करिअरच्या संधी कशा अस्तित्वात असून त्या आपण बुद्धिमत्तेच्या बळावर कशा हस्तगत करू शकतो या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात ठरविलेले स्वप्न साकार करणे सर्वस्वी आपल्या हातात असून त्या स्वप्नाला पूर्ण रूप देण्यासाठी आपले ध्येय निश्चित करण्याची आवश्यकता विशद केली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या व्याख्यानात मत मांडतांना प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या क्षेत्राचे सखोल ज्ञान कसे महत्वाचे आहे या संदर्भात मत व्यक्त करून आधुनिक काळात स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणे महत्वपूर्ण असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी डॉ. पांडुरंग मिसाळ, डॉ. छाया जोशी, प्रा. संजीव कांबळे,प्रा. दिलीप बारी,प्रा. शाहुराज येवते, प्रा. विकास दिघे, प्रा.पारप्पा दुपारगुडे, प्रा.शैला वाळुंज,प्रा. दिपाली ताम्हाणे,प्रा. सविता मानके, प्रा.यशोदा आनेराव, डॉ.प्रिती बुऱ्हाडे,प्रा.समीना मोमीन, प्रा. दिपाली सोनवणे, प्रा.प्रेरणा पाटील, प्रा.सोनाली अभंग, प्रा. पूजा राणे, प्रा.पूजा खवले, श्री.प्रविण भावे,सौ. वर्षा ताजने, कु.नेहा लांडगे इत्यादी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. परमेश्वर भत्ताशे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिध्दी विभागप्रमुख प्रा.माणिक कसाब यांनी दिली.