शबनम न्यूज , प्रतिनिधी :
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी “माझी वसुंधरा” पर्यावरणपूरक अभियान प्रभावीपणे राबवणे सक्तीचे करावे अशी मागणी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवानेता,तथा कृषी, पर्यावरण, शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटना.चे अध्यक्ष: सुरज बाबर यांनी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभाग-2, चे प्रधान सचिव व सचिवांकडे केली आहे. त्यांनी आपल्या निवेदन नमूद केले आहे कि पर्यावरणा बाबतीत आपण विचार केला असता दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल हा ढासळत चालला आहे ओझोनचा थर कमी होत चालला आहे , नद्यांचे ही प्रदूषण होऊन जलचर प्राण्यांवर तसेच मानवी आरोग्यावरही ही परिणाम होत आहे . उदाहरण द्यायचे झाले तर ऑक्टोबर महिन्यात ही ओला दुष्काळ पडत आहे यामुळे शेतकऱ्यांचे, नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे तसेच याचा परिणाम नागरी आरोग्यावरही होत आहे.
पर्यावरण म्हणजे आपल्या भोवतीचा परिसर असे सामान्यपणे म्हणता येईल. यामध्ये आपल्या भोवताली असणारे सगळेच घटक येत असतात.
आपल्या भोवतीचे वृक्ष, पक्षी, प्राणी, माणूस, जमीन,पाणी, हवा, जंगल, डोंगर, या सर्वाचे एकत्रित असणे म्हणजे परिसर असतो. पर्यावरणात या सगळयाच घटकांचा एकत्रितपणे विचार करण्याची आवश्यकता असते. कारण हे सगळे घटक एकमेकांवर अवलंबून असतात.
पर्यावरण म्हणजे शिलावरण, जलावरण, जीवावरण व वातावरण या मुख्य भूवैज्ञानिक घटकांतील सतत चालू असणाऱ्या प्रक्रिया व आंतरक्रिया यांचा परिणाम होय.
निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू , जल, अग्नी आणि आकाश या पंचातत्वावर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी , पर्यावरण पूरक अभियान “माझी वसुंधरा” हा स्तुत्य उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
तरी या उपक्रमाद्वारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी हा उपक्रम सक्तीने केला पाहिजे यासाठी नगर विकास विभाग व ग्रामविकास विभाग यांनी आदेश द्यावेत अशी मी संघटनेच्यावतीने अध्यक्ष या नात्याने आणि शिवसैनीक म्हणून संबंधित सचिवांना विनंती करतो.
आपण जर वातावरणातील पंचतत्वाचा विचार केला असता ,पृथ्वी तत्त्वाशी संबंधित वनीकरण ,वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन ,सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे ध्रुवीकरण , घनकचर्याचे संकलन, विलगीकरण व जुन्या साठवलेल्या कचर्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया, स्वयंपाक घरातील ओला कचरा कंपोस्टिंग करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात येणारे नाविन्यपूर्ण उपक्रम, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन इत्यादी बाबींवर कार्य करण्याची गरज आहे.
वायू तत्वांचे संरक्षण करता यावे म्हणून हवेच्या गुणवत्तेसाठी वायू प्रदूषण कमी करून हवेच्या ,गुणवत्तेत सुधारणा करणे. धूळ कमी करण्यासाठी रस्त्याच्या बाजूने जागेचे हरिती करण करणे ग्रामीण भागामध्ये उज्वला योजनेची व्यापकता , नागरी भागात नॉनमोटराईज वाहतुकीस प्रोत्साहन दिले गेले पाहिजे.
जलतत्वाची संबंधित नदीसंवर्धन ,सागरी जैवविविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनारे यांची स्वच्छता करणे ,रेन हार्वेस्टिंग, रेन वॉटर परकोलेशन,नदी ,तळे व नाले यांचे पुनर्जीवितकरण व शुद्धीकरण सांडपाणी मैला व्यवस्थापन व प्रक्रिया हे उपक्रम प्रामुख्याने हाती घेणे गरजेचे आहे .
अग्नि तत्त्वाशी संबंधित ऊर्जेचा परिणामकारक वापर ,ऊर्जा बचत तसेच ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन देणे .
अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमनूतनीकरणयोग्य ऊर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन ,एकूण सौरऊर्जेवर चालणारे एलईडीवर चालणारे दिवे.ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने पुनरविकृत ऊर्जा म्हणून बायोगॅस प्रकारची उभारणी.
शहरी भागामध्ये हरित इमारतींची संख्या वाढवण्यास प्रोत्साहन देणे तसेच विद्युत वाहनांना वापरण्यास प्रोत्साहन देऊन चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
आकाश तत्त्वाशी संबंधित पर्यावरण सुधारणा व संरक्षणासाठी जनजागृती करणे तसेच हरित कायद्याचे पालन करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे व त्यांची संख्या वाढवणे यावर भर दिला गेला पाहिजे .
निसर्गाच्या या पंचतत्त्वांच्या सोबत जीवनपद्धती अंगीकारलेल्या शिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैवविविधतेचेही अस्तित्व राहणार नाही म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी” माझी वसुंधरा” हे पर्यावरण पूरक अभियान नागरिकांना सोबत घेऊन तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करून तसेच निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवन पद्धती अवलंबिवण्याकरता हे अभियान प्रभावीपणे 31 मार्च 2024 पर्यंतच्या कालावधीमध्ये राबवावे व त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश आपण सर्व स्वराज्य स्थानिक संस्था, जसे की अमृत शहरे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद तसेच ग्रामपंचायतींना देण्यात यावेत अशी मागणी माझ्या समवेत संघटनेचे सचिव गणेश बाबर, खजिनदार विठ्ठल रांजणे, उपाध्यक्ष मिलिंद यादव सोळस्कर, सदस्य जयवंत पवार, लक्ष्मण निंबाळकर, प्रदीप आर्यमाने, संजय जाधव ,ऋतुराज फडतरे, पश्चिम महाराष्ट्र विभागीयअध्यक्ष रणजितसिंह देशमुख ,समन्वयक मंगेश निंबाळकर ,रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सचिन कारेकर ,सातारा जिल्हाध्यक्ष संतोष यादव सोळस्कर, युवा नेते ऋषिकेश मस्के, युवा नेते सर्वजीत बोंडगे, योगेश वेदपाठक, महेश गोळे, सातारा जिल्हा समन्वयक अश्विनी करे, युवा नेत्या रेश्मा भोसले, प्रज्ञा जाधव, सोनाली शिंदे ,मोनाली शिंदे ,करिष्मा मनेर, सलोनी वाला ,अमृता बोबडे, अंजली कोरडे ,सई मोहिते, राजश्री गायकवाड ,आरती वाघ ,प्रतिक्षा भिसे ,दिपाली जगताप, रंभा गोफने करीत आहोत. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.