शबनम न्यूज , प्रतिनिधी :
आज पासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. पंधरा लाख 13 हजार 909 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रश्नपत्रिका वितरित करेपर्यंत त्याचे चित्रीकरण करण्यात येणार असून वाहतुकी वेळी जीपीएस प्रणालीचा वापर केला जाणार आहे.
बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च दरम्यान होत आहे. यंदा विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक सात लाख सात हजार 46 विद्यार्थी, कला शाखेसाठी तीन लाख 81 हजार 982 विद्यार्थी, तर वाणिज्य शाखेसाठी तीन लाख 29 हजार 905 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. .
Advertisement
बारावी परीक्षेचा निकाल मे अखेरीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे