शबनम न्युज | पुणे
दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर इंडिया आघाडीतले आम आदमी पार्टी सर्व मित्र पक्ष केजरीवाल यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यांना अटक झाल्यानंतर अनेक विरोधी पक्ष देखील आरोप/ प्रत्यारोप करत आहेत. यामध्ये आता समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी राळेगणसिद्धी येथून निवेदन जारी करत म्हटले आहे की, मला अत्यंत दुःख झाले आहे की, अरविंद केजरीवाल सारखा माणूस, जो माझ्यासोबत काम करत होता, आम्ही दारूबंदीसाठी आवाज उचलला होता, तो आज मद्य धोरण बनवत आहे. याचे मला वाईट वाटले. पण करेल काय? सत्ते समोर काही चालत नाही. अखेर त्यांना जी अटक कण्यात आली ती त्यांच्या कृती मुळे झाली. आम्ही हे बोललो नसतो तर अटकेचा प्रश्नच नव्हता. जे झाले आहे, ते कायदेशीर पणे, जे व्हायचे ते होईल. ते सरकार बघेल. विचार करेल.’ असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.