शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्यातीलच शहरातील महानगरपालिका शाळातील दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून रक्कम देण्यात येते. मात्र, गेल्या वर्षाभरापासून अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षाची रक्कम मिळालेली नाही. म्हणून दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस रक्कम देण्यात यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह यांना केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. शहरातील खाजगी आणि महापालिका शाळातील दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येतात. मात्र ,गेल्या वर्षभरापासून अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसाची रक्कम मिळाली नाही. यातून आपल्या समाज विकास विभागाचा कारभार लक्षात येतो. महापालिकेचा समाज विभागाकडे अर्ज करून कागदपत्रांची पूर्तता करू नये, मुलांना गुणवंतांना बक्षिसाची रक्कम मिळालेली नाही. वास्तविक आणि गुणवंत मुले मोठ्या परिश्रमाने यश मिळवत असतात. शहराचा लौकिक कायम करत असतात, अशावेळी त्यांना हक्काच्या बक्षीहसवर प्रतीक्षा करायला लावणे योग्य नाही.
तसेच महानगरपालिकेला गतीवान आणि डिजिटल कामकाजासाठी अनेक पुरस्कार मिळालेले आहे. हे शहरासाठी आनंदाची, अभिमानाची बाब असली तरी गुणवंतांच्या बक्षीसाबाबत प्रशासकीय गतिमानता दिसून येत नाही. यात आपण लक्ष घालून गुणवंतांना लवकरात लवकर रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, बक्षाची रक्कम मिळवण्यासाठी संबंधित विभागाला आदेश द्यावेत, असेही सदर निवेदनात राहुल कलाटे यांनी नमूद केले आहे.