शबनम न्यूज : मुंबई (दि.२५ नोव्हेंबर ) :- शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट दारे हि माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, मा.मुख्यमंत्री,मंत्रिमंडळ व पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने १ डिसेंबरपासून ग्रामीण भागात इ.१ली ते ४थी व शहरी भागात इ.१ली ते ७ वीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.
मा.मुख्यमंत्री,मंत्रिमंडळ व पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने १ डिसेंबरपासून ग्रामीण भागात इ.१ली ते ४थी व शहरी भागात इ.१ली ते ७ वीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) November 25, 2021
Advertisement
शाळा सुरु करण्याबाबत सरकारची नियमावली –
शक्य असल्यास प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनीक सुरु करावं
विद्यार्थ्यांचं तापमान नियमीतपणे तपासावं
शक्य असल्यास त्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी
सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात
हेल्थ क्लिनीकसाठी स्थानिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि परिचारिकांची मदत घ्यावी
यासाठी लागणारा निधी CSR फंडातून खर्च करावा.
विद्यार्थी आणि पालकांसाठी सरकारच्या सूचना
मुलांना शाळेत चालत येण्यासाठी प्रोत्साहन द्यावं.
ज्या शाळांमध्ये खासगी वाहनांनी विद्यार्थी येतात त्या वाहनात एका सीटवर एक विद्यार्थी प्रवास करेल याची काळजी घ्यावी.
विद्यार्थी बसमध्ये चढताना आणि उतरताना चालक आणि वाहकांनी विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करावं.
शिक्षकांसाठीही महत्वाच्या सूचना.
जेवण व इतर बाबी केल्यानंतर साबणाने किंवा सॅनिटायजरे हात धुण्याची विद्यार्थ्यांना आठवण करुन द्यावी.
वह्यांची अदलाबदल होणार नाही यासाठी गृहपाठ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास सांगावं.
वेळ असल्यास शक्यतो गृहपाठ वर्गातच करुन घ्यावा.
सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत.
कोरोनाची परिस्थिती सर्वसामान्य झाली की खेळ सुरु करायला हरकत नाही तरीही असे खेळ खेळत असताना आवश्यक ती काळजी घ्यावी.
खेळाचं साहित्य सॅनिटाईज करावं.
खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेषकरुन दमलेल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं.