शबनम न्युज | मुंबई
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. अधिवेशनच्या सुरुवातीला अध्यपदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले कि, सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांना कानात सांगण्यास सांगितलं. आम्ही फडणवीसांच्या कानात सांगितलं तसं झालं असतं तर आज वेगळी परिस्थिती असती असं सांगत आदित्य ठाकरेंनी टीका केली.
एक तरुण व्यक्ती महत्वाच्या स्थानी बसली आहे याचा आनंद आहे. राजकारणाची पातळी खूप खालावत चालली आहे. किती तरुणांना राजकारणात उतरावंसं वाटेल असं मी म्हणत असतो. तुम्ही हा विचार बदलला अशी आशा आहे. प्रत्येकाचा आवाज आपण ऐकावा अशी आशा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
Advertisement