शबनम न्यूज / पिंपरी
मीरा भाईंदर व औरंगाबाद घटनेचा तिव्र संताप चिखली येथे हातगाडी रिक्षा चालकांची निषेध सभा
मिरा भाइंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब हातगाडी धारकांची हातगाडी वरिल साहित्य रस्त्यात फेकून देत सर्वांसमक्ष हातगाडीवरती हातोडा मारून सदर हातगाडी तोडण्यात आली तसेच औरंगाबाद येथे आमदार अंबादास दानवे यांनी रिक्षा चालकास मारहाण केली या घटनेचे गोरगरीब ,कष्टकरी, टपरी, पथारी, हातगाडी धारक ,रिक्षा चालकांमध्ये तीव्र पडसाद उमटले असून पिंपरी-चिंचवड शहरात देखील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
Covid-19 मुळे १४ महिन्यापासून व्यवसाय बंद आहे घरात खायला नाही म्हणून गोरगरीब जनता फळ, भाजी विकून आपली उपजीविका भागवत आहे. महानगरपालिकेचे अधिकारी हातभट्टी दारूचे धंदे असल्याप्रमाणे हातगाडी हातोड्याने तोडत आहेत. गरीब रिक्षाचालकाला आमदार मारहाण करत आहेत. गरिबांवर होणारा हा अन्याय पाहवत नाही. हा शिव, शाहू, फुले, बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे तालिबानी राजवट नाही हे अधिकारी राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे. या घटनेचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्रातील टपरी, पथारी, हातगाडी धारक मीरा भाईंदर येथे जाऊन आयुक्त दिलीप ढोले आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध करणारच हिंमत असेलतर आम्हाला अडवून दाखवा असा इशारा टपरी, पथारी, हातगाडी पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला आहे .
या वेळी निलेश बोराटे, सचिन अल्लाट,तुषार अल्लाट, प्रल्हाद भाऊ कांबळे ,बाळासाहेब ढवळे, लक्ष्मण शेलार, मल्हार भाऊ काळे ,धनंजय कुदळे रिक्षा ब्रिगेट, विजय ढगारे, अनिल शिरसाट ,जाफर भाई शेख, रवींद्र लंके, खालील मकानदार, सुरज सोनवणे, तुषार लोंढे,हे उपस्थित होते .
या वेळी बाबा कांबळे म्हणाले राज्य आणि केंद्र सरकारने फेरीवाला कायदा मंजूर केला असून महानगरपालिकेने स्वतंत्र उपविधी मंजूर केली आहे मा. सर्वोच्च न्यायालयाने देखील हातगाडी धारकांची बाजू देत हॉकर्स धोरण केल्याशिवाय कारवाई करू नये असे आदेश दिले आहेत, हातगाडी पठारी धारकांना विश्वासात घेतल्याशिवाय त्यांचे चुकीच्या ठिकाणी पुनर्वसन केले जात आहे पुनर्वसन केल्याशिवाय नो हॉकर्स झोन ठरवता येत नाही परंतु काही रस्ते नो हॉकर्स झोन ठरवून त्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्यानवर अन्याय केला जात आहे, या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आवाज उठवला जाईल असे यावेळी बाबा कांबळे म्हणाले,
कार्यक्रमाच्या संयोजना साठी शिवाजी कुडूक, नंदलाल निकम, अनिस शेख, मलिक शेख, राजू पाटील, विपुल कांबळे ,राहुल वायाळ ,रवी बल्लाळ, इस्माईल शेख, राजेश कुमार गुप्ता, शिवकन्या उगले, सुनिता खाडे ,सविता बेताब ,सुनंदा गुप्ता ,सविता शिंगोटे
यांनी परिश्रम घेतले.
रिक्षा ब्रिगेड शहर प्रवक्ते अविनाश जोगदंड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले