शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन वार्डाच्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा मनसे वतीने निषेध असल्याचे नगरसेवक सचिन चिखले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तीन सदस्य प्रभाग रचनेला आमचा विरोध आहे. कारण जो कोणी सत्ताधारी पक्ष असतो तो जनतेचा विचार न करता, त्यांच्या कामाचा विचार न करता, फक्त आपल्या पक्षाची सत्ता कशी टिकेल, आपले राज्य कसे राहील, यावर जास्त लक्ष देत असतो. मागील वर्षी भारतीय जनता पक्षाची राज्यांमध्ये सत्ता असताना चारचा प्रभाग करून यांनी निर्णय सर्वसामान्य जनतेवर थोपवला होता. व आता महा विकास आघाडीची सत्ता असताना राज्यातील सरकारने तीन चा प्रभाग करून सर्वसामान्य जनतेवर थोपवण्याचे काम चालू आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. असे सचिन चिखले यांनी सांगितले आहे.
पुढे बोलताना सचिन चिखले म्हणाले की, विकास कामे करत असताना सर्व नगरसेवक व अधिकारी वर्ग यांना अनेक समस्यांचा, अडथळ्यांचा सामना करावा लागतो. वेगवेगळ्या समस्या पुढे येतात, काम रेंगाळत राहतात, निवडणूक झाल्यानंतर, आल्यानंतर असे निदर्शनास आले आहे की, सर्व महापालिका बीएमसीच्या नियमानुसार चालते. परंतु एक महानगरपालिका एक निर्णय, व दुसऱ्या महानगरपालिकेला दुसरा निर्णय, हे योग्य नाही. त्याचप्रमाणे शेजारी असणारी महानगरपालिका पुणे महानगरपालिका यामध्ये प्रभाग स्तरावर काम करत असताना अ ब क आणि ड यांना प्रत्येक नगरसेवकांना वेगळा निधी दिला जातो. परंतु आपल्या महानगरपालिका अ ब क ड नुसार निधी न देता कॉमन निधी दिला जातो. यामध्ये नगरसेवकांचा सुद्धा कामावरून वाद होतो. असा मोठा भेदभाव आमच्या निदर्शनास आलेला आहे. म्हणून तीन सदस्य प्रभाग रचनेला मनसेचा निषेध असल्याचे यावेळी सचिन चिखले यांनी म्हटले आहे. तसेच येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीनिशी लढेल असेही नगरसेवक सचिन चिखले यांनी जाहीर केले आहे.