शबनम न्यूज | मुंबई
मुंबई । प्रतिनिधी
कोरोनाचे निर्बंध शिथील करून राज्यातील शाळांची प्रत्यक्ष सुरुवात आजपासून करण्यात आली. याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट द्वारे राज्यातील सर्व विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे कि, शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना शुभेच्छा. मुलांची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. ती निश्चितपणे पार पाडली जाईल, हा विश्वास आहे आणि आज आपण या निर्धाराने पुढे जाऊ की, एकदा उघडलेली शाळा पुन्हा बंद करायची वेळ येऊ द्यायची नाही.असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केले आहे.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना शुभेच्छा. मुलांची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. ती निश्चितपणे पार पाडली जाईल, हा विश्वास आहे आणि आज आपण या निर्धाराने पुढे जाऊ की, एकदा उघडलेली शाळा पुन्हा बंद करायची वेळ येऊ द्यायची नाही.
– मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/vtbFYJY8tpAdvertisement— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 4, 2021
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या हस्ते माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मला माझे शाळेतले दिवस आठवताहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. पूर्वीचा दिवस वेगळेच असायचे. मित्रांना भेटण्याची उत्सुकता, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे, अशी आठवण सांगत आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा आव्हानात्मक काळ सुरू आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या. शिक्षकाला बरे वाटत नसेल, तर त्याने लगेच चाचणी करून घ्यावी. पावसाळा अजून संपला नाही. साथीचे रोगही येतात. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेऊन सर्वानी काम करावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.