शबनम न्यूज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
आर्यन खानच्या चॅटमधून अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा झाल्यानतंर तसंच काही नावं समोर आल्यानंतर मुंबईत पुन्हा एकदा कारवाईला वेग आला आहे. एनसीबीकडून मुंबईत वांद्रे, अंधेरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. यादरम्यान एनसीबीचं एक पथक शाहरुख खानच्या घरी मन्नतवर पोहोचलं होतं.
Advertisement
एनसीबीचे अधिकारी शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर दाखल झाले होते. एनसीबीने यावेळी नोटीस दिली असून आर्यन खानशी संबंधित इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तपासासाठी तपास यंत्रणेकडे सादर करणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. मोबाइल फोनमधील चॅटमधून महत्वाची माहिती लागल्यानंतर इतर गोष्टींमधूनही काही खुलासे होऊ शकण्याची शक्यता एनसीबीला वाटत आहे.
Advertisement