शबनम न्यूज | मुंबई
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीप्रकरणी ठाण्यातील न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. मुंबई गुन्हे शाखेने या संबंधित मुंबईच्या किल्ला कोर्टात याचिका दाखल केली होती.
परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी वसुलीचे आदेश दिल्याचे आरोप करून खळबळ उडवून दिली होती. यानंतर परमबीर सिंह देखील बेपत्ता आहेत. परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब नंतर मुंबई ठाण्यासह इतर शहरांमध्ये खंडणी आणि धमकावण्याचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाची मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करत आहेत. परंतु परमबीर सिंह यांचा ठावठिकाणा कोणालाच माहीत नाही.
Advertisement
Advertisement