शबनम न्युज | लोणावळा
मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा सुरू आहे. त्यांचा पाचवा दिवस पुण्यात गेला तर सहाव्या दिवसाची सुरुवात आणि अख्खी रात्र पिंपरी चिंचवड शहरात गेली आहे. ठिकठिकाणी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. काल रात्री मनोज जरांगे पाटील हे काळेवाडी फाटा येथे रात्री दोन वाजता तर डांगे चौक येथे पहाटे चार वाजता पोहोचले होते.
सर्व मराठ्यांनी 26 जानेवारी रोजी मुंबईला यावं असं, आवाहन ते करत आहेत. आज जरांगे पाटील यांची पदयात्रा लोणावळ्यात पोहोचली आहे. मुंबईत पोहोचण्याआधी सरकारकडून जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जरांगे पाटलांशी चर्चा करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जरांगे पाटलांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आता फक्त वाशीचा मुक्काम बाकी, मग मुंबईत जाणारच. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, मी समाजाचा शब्द मोडत नाही, आपल्या मोर्चामुळे कुणाला त्रास होता कामा नये, असं मनोज जरांगे पाटलांनी म्हंटल आहे.