देवेंद्रजी जेव्हा पवार साहेबांवर टीका करतात तेव्हा चमत्कार घडतात..
शबनम न्यूज | मुंबई (दि.१३ डिसेंबर) :- राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत टोलेबाजी केली आहे. मलिक यांनी म्हटलं की, “पवार साहेब पंतप्रधान होतील असा कुठलाही दावा केलेला नाही. उलट पवार साहेब देशातल्या सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणण्याचे काम करत आहेत आणि विरोधकांच्या एकजुटीमुळे मोदी सरकार हे सत्तेतून बाहेर जाईल हे आमचे म्हणणे आहे.
लोकशाहीत अमृत पिऊन कोणीही सत्तेत बसत नाही हे देवेंद्र फडणवीसांना कळायला हवे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी @PawarSpeaks साहेबांवर टीका केली. ते जेव्हाही साहेबांवर टीका करतात तेव्हा काही ना काही चमत्कार घडतो. त्यांच्या टीकेमुळेच असा चमत्कार २०२४ सालीही घडेल – @nawabmalikncp pic.twitter.com/lyUBU5f5JU
Advertisement— NCP (@NCPspeaks) December 13, 2021
देवेंद्रजी तुम्ही शाळेत होतात तेव्हा १९८४ साली लोकसभा निवडणुकीत भाजपची संख्या दोनवर गेली होती आणि तुमचे खासदार सायकलवर बसून डबलसीट संसदेत जात होते, हे तुम्ही विसरला का ?”, असे नवाब मलिक म्हणाले. ” मला वाटतं ही लोकशाही आहे. अमृत पिऊन कोणी सत्तेत बसत नाही, हे देवेंद्रजी यांना कळले पाहिजे. देवेंद्रजी जेव्हा पवार साहेबांवर टीका करतात तेव्हा चमत्कार घडतात. आम्ही २०२४ ला चमत्कार घडवू”, असं मलिक यांनी म्हंटलं आहे.
२८ खासदार असणाऱ्या गुजरातमधील असणारी व्यक्ती पंतप्रधान बनू शकते तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रातील महाराजांचा मावळा हा सर्वोच्च स्थानी का विराजमान होणार नाही असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं होतं. तेव्हा पंतप्रधान होण्याचं स्वप्न पहाणं वाईट नाही, पण त्यांचा पक्ष १० खासदारांचा आकडाही पार करु शकला नाही अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तेव्हा फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.