शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०७ फेब्रुवारी) ;- पुणे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या टू व्हीलर बाइक चालकास रिक्षाचालकाने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. याबाबत महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी आपली भूमिका जाहीर केली असून महाराष्ट्र रिक्षा पंचायत व रिक्षा ब्रिगेड पदाधिकारी अशाप्रकारे चुकीचं वागणार नाही तसेच आम्ही हिंसेचे कधीही समर्थन करत नाही, परंतु सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सरकार गोरगरिबांना आपापसात लढवत आहे. चुकीचा पायंडा पाडून रिक्षाचालकांना अशाप्रकारे चुकीचे कृत्य करण्यास भाग पाडत आहे. कोविड मुळे हैराण झालेल्या रिक्षाचालकांना आता जगायचं कसं? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी रिक्षाचालकांनी संयम सोडू नये, सत्याचा विजय नक्की होईल, असे बाबा कांबळे म्हणाल.
यास सर्वस्वी केंद्र व राज्य सरकार जबाबदार असून केंद्र सरकारने राज्य सरकारने तातडीने बेकायदेशीर पणे सुरू असलेले टू व्हीलर बाईक बंद करावी अशी मागणी देखील यावेळी बाबा कांबळे यांनी केलेले आहे. केंद्र सरकार ओला उबेर या भांडवलदार कंपन्यांना नेहमीच मदत करत असून ओला उबेर या कंपन्यांनी आता परिवहन खात्याचे नियम धाब्यावर बसून बेकायदेशीरपणे टू व्हीलर बाइक सुरू केली आहे ती ताबडतोब बंद झाली पाहिजे यासाठी कायदेशीर मार्गाने आपल्याला पुढे जायचे आहे आपला हा लढा अधिक बळकट बुलंद करायचा आहे, रिक्षा चालक मालकांनी अशाप्रकारे टू व्हीलर बाइक चालकांना मारहाण करू नये कायदा हातात घेऊ नये अशा प्रकारचे आव्हान देखील बाबा कांबळे यांनी रिक्षा चालक मालक यांना केले आहे.
बेकायदेशीर टूवीलर बाईक बंद व्हावे यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने सह्यांची मोहीम सुरू असून पंतप्रधान केंद्रीय परिवहन मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री, त्यांना लवकरच सह्यांचे निवेदन पाठवण्यात येणार आहे रिक्षा चालक आंदोलनात सहभागी होऊन निवेदनावरती सह्या कराव्यात निवेदन देऊन देखील आपल्या मागण्या पूर्ण नझाल्यास १८ तारखे नंतर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल यावेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी केंद्र व राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशारा देखील यावेळी बाबा कांबळे यांनी दिला आहे.