शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड / पुणे (दि.१६ एप्रिल) :- कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीच्या नेतृत्त्वात काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला. या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ‘हिमालयात जाईल’ या विधानावर ट्रोल केले जात आहे.
त्यांच्या या वक्तव्यावर राजकारणातील अनेक नेत्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान,राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खोचक शब्दांत ट्वीट करत चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटर वर एक फोटो शेअर केला आहे ज्यात चंद्रकांत पाटील मांडी घालून आणि डोळे मिटून बसल्याचं दिसत आहे. तो फोटो मॉर्फ्ड करून त्याच्या पार्श्वभूमीवर हिमालयाचा फोटो लावण्यात आला आहे. सोबत बॉक्समध्ये ‘मी पोहोचलो रे हिमालयात’ असं वाक्य लिहिलं आहे. हे ट्वीट शेअर करताना जितेंद्र आव्हाडांनी “नको, परत या”, अशी खोचक टिप्पणी केली आहे.
नको परत या .. pic.twitter.com/JL89jsfRxb
Advertisement— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 16, 2022
तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत म्हंटले कि, “मी तुम्हाला परत सांगतो हे असं म्हटले, ते तसं म्हटले, निवडणुकीच्या काळात मतदारांना खात्री पटायला, विश्वास वाटायला, त्यांनी आपल्यालाच मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये दोन्ही बाजूंनी केली जातात.”
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी “चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील, तर मी देखील त्यांच्यासोबत जाईल,”असं टोला लगावला आहे. “मी आज चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात आढावा घेण्यासाठी आलोय. त्यांनी कोल्हापूर मागेच सोडलंय, पण मी कोथरूडमधील कार्यकर्त्यांशी संवाद केला. त्यावरून चंद्रकांत पाटील यांना हाही मतदारसंघ सोडावा लागेल इतकं त्यांच्याविषयी प्रेम आपुलकी येथे दिसत आहे.”
काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वरून चंद्रकांत दादा हिमालयात जायला निघाला की कळवा बरं का! असं बोलत ट्रोल केलं जात आहे.
चंद्रकांत दादा हिमालयात जायला निघाला की कळवा बरं का!#उत्तरकोल्हापूर #महाविकासआघाडी pic.twitter.com/eRS4rjP7tR
Advertisement— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 16, 2022
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजा राजापुरकर यांनी ही चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मुंबई ते हरिद्वार थ्री टायर एसी तिकीट काढलं आहे. हरिद्वारपासून हिमालयपर्यंत खेचर सेवा मिळण्यासाठीही बोलणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. पाटील यांना त्रास होऊ नये अशी आमची इच्छा आहे. त्यामुळेच त्यांच्यासाठी थ्री टायर एसीचं तिकीट काढल्याचं राजापुरकर म्हणाले.
आ. चंद्रकांत पाटील यांचा मतदार संघ असलेल्या कोथरूडमध्ये ही झळकले “चंद्रकांत दादा” हिमालयात कधी जाताय ? अशा स्वरूपाचे बॅनर्स