शबनम न्यूज : आळंदी (दि.२७ एप्रिल) :- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव आळंदी या ठिकाणी, महाराष्ट्र शासन व उच्च व तंत्र शिक्षण विभागा मार्फत शरदचंद्र पवार महाविद्यालयाला उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार व प्रा. डॉ. विशाल गायकवाड यांना उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून मिळालेल्या पुरस्काराचे औचित्य साधून अभिनंदन व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पुरस्कार विजेते प्रा. डॉ. विशाल गायकवाड यांनी त्यांना महाराष्ट्र शासनाचा व राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून मिळालेल्या पुरस्काराला उत्तर देताना राष्ट्रीय सेवा योजना हे महाविद्यालयातील सर्व मुलांना बोलते करणारे खुले व्यासपीठ असून या योजनेमुळे व्यक्तीचा कसा सामाजिक विकास होतो तसेच महाविद्यालयाला मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार हा केवळ माझा एकट्याचा नसून माझ्या समवेत असणारे सर्व प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांचा आहे असे मत व्यक्त करीत शैक्षणिक वर्ष २०१७ -१८ मधील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
यावेळी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी महाविद्यालयाला मिळालेल्या राज्यस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराला उत्तर देतांना या पुरस्काराचे मानकरी प्रा. डॉ. विशाल गायकवाड यांना सतत प्रेरणा प्रोत्सहन पाठबळ दिले व नेहमी त्यांना सहकार्य केले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेत केलेल्या कामाला सहमती दर्शवली, तसेच या पुरस्कारासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. विशाल विलास तांबे सचिव मा. श्री. वैभव विलास तांबे आणि खजिनदार मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल सहकार्य लाभले असे मत व्यक्त करीत सर्व सहकारी सहाय्यक प्राध्यापक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी महाविद्यालयातील युवकाला खऱ्या अर्थाने घडविण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना हा विभाग करीत असून विद्यापीठ स्तरावर सामाजिक काम करणाऱ्या सर्वच व्यक्ती राष्ट्रीय सेवा योजनेमुळे घडलेल्या आहेत असे मत व्यक्त करीत राज्यस्तरीय पुरस्कार विजेते प्रा. डॉ. विशाल गायकवाड व डॉ.पांडुरंग मिसाळ यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाला प्रा. संजीव कांबळे, प्रा. माणिक कसाब, प्रा. शैला वाळुंज, प्रा. कैलास अस्तरकर, प्रा. शाहूराज येवते, प्रा. विश्वनाथ व्यवहारे, प्रा. विकास दिघे, प्रा. यशोदा खुळखुळे, प्रा. प्रेरणा पाटील, प्रा. सविता मानके,प्रा. दिपाली सोनवणे इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रणजीत कदम यांनी केले व सूत्रसंचालन प्रा. दिलीप बारी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. परमेश्वर भताशे यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.