शबनम न्युज | पिंपरी
“प्रतिभेबरोबर सजग सृजनशीलता आणि जीवनाकडे पाहण्याचा सौंदर्यवादी,सकारात्मक दृष्टिकोन असेल तर नक्कीच अनुभूतिमध्ये प्रगल्भ आशयघन कविता सापडू शकते;यासाठी अनुभूतिशी सातत्याने सुसंवादही हवा असे प्रतिपादन पहिल्या विश्व काव्यसंमेलनाचे अध्यक्ष,ज्येष्ठ कवी सर डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.आम्ही सिध्द लेखिका या राज्यस्तरीय संस्थेतर्फे नुकतेच निमंत्रित कवयित्रींचे ऑनलाईन काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते,या संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात डाॅ.घाणेकर बोलत होते.प्रारंभी स्व.शिवकुमार शर्मा यांना ‘संतुरधून ‘ विषयक स्वलिखित काही कविता सादर करुन भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.औरंगाबादच्या विभागीय अध्यक्षा माधुरी चौधरी यांनी प्रास्ताविक केले. माधवी देवळणकर यांनी स्वागत केले. कार्याध्यक्षा मृणाल देशपांडे यांनी काव्यसंमेलनाचे प्रभावी सूत्रसंचालन केले.
माधुरी चौधरी,मृणाल देशपांडे,माधवी देवळेकर यांच्यासह सरिता शिरपूरकर, नीलिमा पुजारी,नीशा कापडे,मंगला चौरे,वैशाली चव्हाण,मंजरी मार्लेगावकर, साधना ढवळे,संध्या पिंपळकर,लता बावणे,सुनिता कपाळे,आदि कवयित्रींनी हे बहारदार काव्य संमेलन गाजवले.सर्वांच्या कवितांमधे दुर्दम्य आशावाद, स्त्री सबलीकरण,पर्यावरण, प्रेम,संगीतानुभूती आदि विषयक वैशिष्ट्यपूर्ण शब्दांकित केले होते.मंगला चौरे यांनी आभार मानले.समारोपात खास लोकाग्रहास्तव डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी शीळवादन, रफी.किशोरकुमार यांची गाणी सादर केली आणि उपस्थितांनीही तेव्हडीच भरभरुन..उत्स्फूर्त दाद दिली.