शबनम न्युज | मुंबई
एकीकडे विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी महाविकासआघाडीची अनेक मतं फुटली आणि भाजपाने त्यांच्या सर्व पाच जागांवर विजय मिळवला. दुसरीकडे निकालानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे संपर्काच्या बाहेर गेले आणि राजनैतिक भूकंप पाहावयास मिळाला. आता या भूकंपाचा झटका काँग्रेसला ही लागला आहे. काँग्रेसचे पाच आमदार नॉट रिचेबल झाले आहेत.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील आमच्याच आमदारांमध्ये नाराजी असेल तर दुसऱ्यांवर नाराज होण्याचा प्रश्न येत नाही. काहीतरी बिघडलेय, ते आधी पहावे लागेल असे म्हटले होते. या साऱ्या घडामोडींवर काँग्रेसने आपल्या आमदारांना तातडीने मुंबईला बोलविले आहे. तसेच दिल्लीतून प्रभारी देखील नियुक्त करण्यात आला आहे.काँग्रेसचे पाच आमदार नॉट रिचेबल येत आहेत. यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेस नेते देखील या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.