शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी एक धक्कादायक प्रकार घडला. आपल्या पतीच्या निधनानंतर पतीचा ट्रान्सपोर्ट व गार्बेज कचरा विक्री व्यवसाय करणाऱ्या विधवा महिलेला व्यावसायिक वादातून आठ ते नऊ जणांनी घरात घुसून बेदम मारहाण केली. या मारहाणीत सदर महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण तसेच एक तोळ्याची सोन्याची चैन व पाच ग्राम वजनाचे मणी तसेच टेक्नो कंपनीचा मोबाईल असे एकूण ९० हजार रुपयाचे ऐवज या मारहाणीकरिता आलेल्या आरोपींनी चोरून नेले.
सदर घटनेची फिर्याद शर्मिला वशिष्ठ चाटे या महिलेने चिखली पोलीस स्टेशन येथे दिली. यानंतर चिखली पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी यापैकी दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर मारहाण करणे, दरोडा टाकणे, या गुन्ह्यांच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या देशात महिलांना ५० टक्के आरक्षण दिले गेले आहे, तरीही महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाही. एका विधवा महिलेला अशी बेदम मारहाण होते. तिला दहशतीखाली जगावे लागते, यालाच आपण महिलांना मिळणारे ५० टक्के आरक्षण म्हणणार का? असा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
शबनम न्यूज च्या प्रतिनिधी यांनी सदर महिलेशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराबद्दल संपूर्ण माहिती घेतली. फिर्यादी महिला शर्मिला वशिष्ठ चाटे यांनी झालेला प्रकार सांगितला. त्यांनी सांगितले कि, माझे पती वशिष्ठ चाटे यांचे सहा महिन्यापूर्वी निधन झाले. माझ्या पतीचा ट्रान्सपोर्ट व गार्बेज वेस्टीज कचरा घेऊन पुढे विक्री करण्याचा व्यवसाय होता. सदरचा व्यवसाय पतीचे निधनानंतर मी स्वतः चालवीत होते. जालिंदर फड हे ही एकच व्यावसाय करत होते. परंतु पतीचे निधन झाल्यानंतर त्यांच्यात व आमच्यात व्यवसायाचे निमित्ताने स्पर्धा होत होती. सचिन जालिंदर फड या इसमाने माझ्या परस्पर माझे नावाने स्क्रॅप ची गाडी भरली. मी विचारणा केली असता, सचिन फड यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर दुपारी तीन वाजता त्यांनी सात ते आठ जणांसोबत माझ्या घरी येऊन मला बेदम मारहाण केली. यामध्ये सचिन जालिंदर फड त्याची पत्नी कोमल सचिन फड, त्याचे वडील जालिंदर बन्सी फड, संगीता जालिंदर फड, जालिंदर यांचा मुलगा व मुलगी तसेच संगीता ढाकणे,उषा मुंडे, पवन मुंडे (सर्व रा.हणार जाधववाडी) असे या सर्व जणांनी मला लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच सचिन फड याचे सांगण्यावरून त्यांनी सर्वांनी माझा मोबाईल काढून घेतला. या मारहाणीत त्यांनी माझे सोन्याचे दागिने लुटले. मी आरडाओरडा केला त्यानंतर हे सर्वजण घराबाहेर पडले व निघून गेले. या सर्व घटनेची माहिती चिखली पोलीस स्टेशनला देण्यात आली. त्यांनी गुन्हा नोंद करताना उशीर केला. परंतु घटनेच्या तीन दिवसानंतर गुन्ह्याची नोंद झाली. हे नोंद झाल्यानंतर या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे ,अशी माहिती शर्मिला चाटे यांनी शबनम न्यूज प्रतिनिधीकडे दिली. तसेच त्यांनी अशीही मागणी केली आहे कि, या घटनेतील सर्व आरोपींना कडक शिक्षा व्हावी, आणि जोपर्यंत कडक शिक्षा होत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही. या घटनेतील २ आरोपी अटक व बाकीचे आरोपी मोकाट असल्यामुळे.. आणखी भीती चे वादळ त्याच्यावर घुमत आहे.. तरी सर्व आरोपीना अटक व्हावी व न्यायालयाने न्याय करावा, अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.
सदर आरोपींवर मारहाण करणे दरोडा टाकणे, अशा गंभीर गुन्ह्यांच्या कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला असून, सदर घटनेतील दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. पुढील तपास चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहेत.