६० कॉर्पोरेट प्रतिनिधी आणि १ हजार व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थ्यांचा सहभाग
शबनम न्युज | पुणे
‘इंडस्ट्री इन्स्टिट्यूट पार्टनरशिप समिट २०२२’ या राष्ट्रीय परिषदेला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला.भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) ने आयोजित या परिषदेत कॉर्पोरेट जगताचे ६० प्रतिनिधी आणि व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या १ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग होता.उद्योग जगतातील सुरोजित रॉय,डॉ अनिर्बन सरकार,डॉ अविनाश दलाल या मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन झाले.भारती अभिमत विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ सचिन वेर्णेकर यांनी स्वागत केले.
” कार्पोरेट जगत आणि मॅनेजमेंट महाविद्यालये यांच्यात सातत्यपूर्ण संवादाची गरज असून एकमेकांच्या गरजांचा शास्त्रशुद्ध अभ्यास व्हायला हवा ‘असे प्रतिपादन डॉ . सचिन वेर्णेकर यांनी केले . ते म्हणाले ,’कार्पोरेट जगत आणि व्यवस्थापनशास्त्र प्रशिक्षण महाविद्यालये यांच्या एकमेकांकडून विविध अपेक्षा असतात ,त्याचा अभ्यास व्हायला हवा . भारती विद्यापीठ दूरदृष्टी ठेवून ,भविष्याची गरज ओळखून विद्यार्थ्यांची जडण घडण करण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे . व्यवस्थापनशास्त्र व इंडस्ट्रीमधील संवादाची दरी भरून काढण्यासाठी प्रयत्न करू . त्यासाठी स्व . पतंगराव कदम यांची या संदर्भातील धोरणे दिशादर्शक ठरतील .
यावेळी बोलताना सुरोजित रॉय म्हणाले ,’ कार्पोरेट जगत आणि व्यवस्थापन शास्त्र विद्यार्थी यामध्ये संवाद प्रक्रियेबद्दल आयएमइडी चा पुढाकार महत्वपूर्ण आहे . कार्पोरेट जगतात गांभीर्याने काम करणारे आणि मूल्यव्यवस्था मानणारे विद्यार्थी यावेत अशी अपेक्षा असते . काम सुरु केल्यावर त्यांच्या प्रशिक्षणावर जास्त वेळ घालवावा लागू नये ,अशी कार्पोरेट जगाची अपेक्षा असते . विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या सांस्कृतिक वातावरणात काम करावे ,त्यांच्याकडे तसे संवाद कौशल्य असावे ‘
‘व्यवस्थापन विद्यार्थ्यांची उद्योगासंबंधित अपेक्षा’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन यावेळी करण्यात आले . आयएमईडीच्या ‘प्लेसमेंट ब्रोशर’चे प्रकाशन या झाले . उद्योग, व्यवस्थापन शास्त्रातील महत्त्वपूर्ण विषयांवर गटचर्चा, खुली चर्चा देखील आयोजित करण्यात आली .