शबनम न्युज | पुणे
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींनी महाराष्ट्राची अस्मिता दुखावल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत संतापजनक विधान केले. याविषयी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले,कधी भाजपाचे प्रवक्ते तर कधी महामहिम राज्यपाल महोदय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वारंवार बेताल वक्तव्य करत आहे. नक्की भाजपाला खुपतंय काय ? असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित करत याचा निषेध व्यक्त केला.
पुढे ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता होते, आहेत आणि यापुढेही राहतील. त्यामुळे सुधांशू त्रिवेदी यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे. भाजपाने आपली छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नेमकी भूमिका काय आहे? ही महाराष्ट्रासमोर स्पष्ट करावी. महाराष्ट्राची अस्मिता दुखावल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी खासदार कोल्हे यांनी केली आहे.