शबनम न्युज | घोटावडे
येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर पार पडले.
या शिबिरात ग्रामसफाई, पाणी आडवा पाणी जिरवा, भारतीय संविधान जागृती, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची साफसफाई आदी उपक्रम पार पडले. तसेच यावेळी वृक्षारोपण, पथनाट्य,गटचर्चा, सांस्कृतीक कार्यक्रम करून विद्यार्थ्यांनी ग्रामस्तांची दाद मिळवली. सात दिवस चाललेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांनी गावात अनेक विधायक कामे करून गावकऱ्यांच्या मनात आपूलकी निर्माण केली. विद्यार्थ्यांनी नववर्षाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता करून, संकेत नावाच्या विद्यार्थ्यांने दिलेल्या शिववंदनेने अक्षरशः गावकऱ्यांच्या अंगावर शहार व डोळ्यात अश्रू आनले.
शिबिराच्या अखेरच्या दिवशी विद्यार्थ्यांनी सादर केलेला सांस्कृतीक कार्यक्रमाला तर गावकऱ्यांची उत्फुर्त दाद मिळाली. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सामाजिक संदेश देणाऱ्या पथनाट्यांबरोबरच विविध लोकगितांवर अधारित नृत्यांसह कलाआविष्कार सादर करून गावकऱ्यांच्या टाळ्या मिळवल्या. सातव्या दिवशी गावातून परतताना गावकऱ्यांसहीत विद्यार्थ्यांच्याही डोळ्यांत अश्रू तराळले होते.
शिबिरा दरम्यान सात दिवस विविध वक्तांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, ज्यामध्ये डॉ.प्रभंजन चव्हान, प्रा.तुळशीराम घोलप, डॉ.बाळासाहेब कल्हापुरे, प्रा.भिमराव पाटील, आदींचा समावेश होता. शिबिराचे उद्घाटन गटविकास अधिकारी संदीप जठार व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरूण आंधळे यांच्या हस्ते करण्यात आले. व शिबिराच्या समारोपा प्रसंगी आदर्श सरपंच बाबाजी शेळके, नवनाथ शेळके, सविता गवारे आदी उपस्थित होते.
या शिबिरासाठी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.सुशिलकुमार गुजर व डॉ.रेश्मा दिवेकर ह्या विद्यार्थ्यांसमवेत सातही दिवस उपस्थित होते. सोबतच प्रा.संतोष मोरे, प्रा.निखिल लेंडे, प्रा.चंद्रकांत बोरुडे, प्रा.स्नेहल लोंढे, प्रा.सायली गोसावी, प्रा.शेखर गुंजाळ व कार्यलयीन सेवक अनिल मते व रोहन कांबळे यांनीही शिबिरात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना श्रमदानासाठी प्रोत्साहीत केले.