शबनम न्युज | मुंबई
राष्ट्रवादीचे अध्यक्ष पदाचा राजीनामा देताना मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवे होते, पण अध्यक्ष पदासाठी समिती नेमली असून ५ मे रोजी बैठक होणार आहे, समिती जो काही निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल, असे शरद पवार यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. काल शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी आज पहिली प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, “मी वरिष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले पाहिजे होते, असे मला आता जाणवत आहे. जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकरित्या सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला, पण आपण ६ मे ची बैठक ५ मे रोजीच घ्या, समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, १ मे 1960 रोजी मी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पदाची जबाबदारी घेतली होती. त्यामुळे माझं १ मे सोबत वेगळेच नातं आहे. मी युवक काँग्रेसच्या बैठकीत भाकरी फिरवण्याचा वक्तव्य केले होते, मी युवकांची मतं विचारात घेणारा नेता आहे, त्यामुळे तुमच्या मतांचा मी आदर करतो. ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना मुख्य प्रवाहात आणायचे आहे, असे शरद पवार म्हणाले.