शबनम न्युज | मुंबई
महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत, तामिळनाडूमधील जल्लाकट्टू आणि कर्नाटकातील कम्बाला या खेळांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरून बंदी कायमची उठवली आहे. यामुळे महाराष्ट्रातून सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.
त्या म्हणाल्या, “भिर्रर्रर्र…. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी अखेर कायमची उठवली. यामुळे बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. बैलगाडा शर्यत हा क्रीडाप्रकार ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे. याखेरीज खिल्लार या देशी गोवंशाची यामुळे जपणूक होणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीची जपणूक होणार आहे. या निर्णयाबद्दल सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार”, असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.