शबनम न्युज | मुंबई
पुढील वर्षी राज्यात विधानसभा आणि देशात लोकसभा निवडणूक होणार आहे. या एकत्र होतील की स्वातंत्र्य यावरही संभ्रम निर्माण झालेला असताना महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. असे असतानाच लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील 48 जागांचे वाटप महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये कशाप्रकारे असेल याची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान याबाबत संजय राऊतांना माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता, त्यावर राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे.
ते म्हणाले, “आमची पहिली बैठक शरद पवारांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. त्या बैठकीला उद्धव ठाकरेही होते. पण १६-१६ चा फॉर्म्युला ठरला ही बातमी मला तुम्ही देताय. आम्हाला माहिती नाही. बैठकीत जे काही ठरलंय, त्याबाबत बाहेर आलेली माहिती चुकीची आहे. असा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही”, असे संजय राऊत म्हणाले.
Advertisement