पंतप्रधानांनी दोन दिवसापूर्वी एक स्टेटमेंट दिले होते, त्या स्टेटमेंट मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचाराने बरबटलेला पक्ष असल्याचे सांगितले होते आणि आज त्याच राष्ट्रवादी पक्षाच्या काही नेत्यांना त्यांनी मंत्रिमंडळात सामील करून घेतले म्हणजे दोन दिवसांपूर्वी केलेल्या आरोप यातून राष्ट्रवादी पक्षाचे नेत्यांची मुक्तता केली असल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषद सांगितले.
पूर्वीच काही सहकाऱ्यांनी आपली भूमिका वेगळी घेतली होती. किती लोकांनी आपली भूमिका वेगळी घेतली हे लवकरच स्पष्ट होईल, आजचा हा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही, आमदारांपैकी आता माझ्याकडे फक्त सहा जणच राहिले. माझ्याकडे आता फक्त सहा जण राहिलेत आता त्यांना सोबत घेऊनच मी राष्ट्रवादी पक्ष वाढविणार.
माझा महाराष्ट्राच्या सर्व सामान्य जनतेवर प्रचंड विश्वास आहे. आधी जे पक्ष सोडून गेले ते पराभूत झाले. अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही सहकारी माझ्या संपर्कात आहेत. जे घडलं त्याची मला चिंता नाही, असेही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उद्यापासून मी परत एकदा जोमाने काम सुरू करेल व राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यावर माझा भर असेल, उद्या कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांनी पक्षावर दावा केला तर मी लोकांमध्ये जाईल. मला सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा मिळणार, अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला याची मला माहिती नाही. मला आत्ताच माहीत झाले. असे शरद पवार यांनी सांगितले अजित पवार यांनी बंड केल्याचे शरद पवार यांनी आपल्या वक्तव्यातून मान्य केले.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर माझा विश्वास आहे. तर त्यांनी अस्वस्थ होऊ नये असेही आवाहन शरद पवार यांनी केले.
माझी अजित पवार यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही शपथविधी पूर्वी फक्त छगन भुजबळ यांच्याशी बोलणं झालं जे काही घडलं याची मला चिंता नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले माझी खरी शक्ती सामान्य माणूस आणि तो माझ्या बरोबर आहे.
पक्षाचे काही आमदार ईडी चौकशीमुळे अस्वस्थ होते, त्यातच दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते जास्त अस्वस्थ झाले त्यामुळेच हा प्रकार घडला असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. आम्ही न्यायालयात जाणार नाही आम्ही जनतेत जाणार व पक्ष वाढविणार असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.