शबनम न्यूज | जालना
जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरंगे पाटील यांची भेट घेतली. तसेच त्यानंतर आज मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांना सरबत देऊन उपोषण मागे घेतले.
गेल्या 16 दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होते. जरांगे यांनी गेल्या काही दिवसापासून पाणी घेणे देखील बंद केले होते. पण आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरबत पिऊन त्यांनी उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अखेर 17 व्या दिवशी मनोज जरांगे यांनी हे उपोषण मागे घेतले आहे.
याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, संदिपान भुमरे, राजेश टोपे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर यांची देखील उपस्थिती होती.