शबनम न्युज | पिंपरी
विज्ञानाचा आधार घेऊन धर्माची वाटचाल झाली पाहिजे, असे सांगणारे आधुनिक काळातील आणि ऋषी परंपरेतील महर्षि दयानंद हे महान व्यक्ती आहेत. महर्षि दयानंद यांनी विधवांसाठी, अनाथांसाठी, जातीपाती तोडो – समाज को जोडो अशी हाक देऊन समाजाला एकत्र करण्याचे तसेच घरातील महिला, मुलींसह सर्वांना धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे यासाठी महान काम केले आहे. या देशात हिंदू समाज टिकवायचा असेल तर महर्षी दयानंद यांच्या विचारांचे आचरण करावे लागेल असे प्रतिपादन पिंपरी आर्य समाजचे उपाध्यक्ष उत्तम दंडिमे केले.
महर्षि दयानंद सरस्वती जन्मद्विशताब्दी महोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्ररक्षा बहुकुंडीय यज्ञाचे (हवन) आर्यसमाज पिंपरी नगर आणि पिंपरी गावातील शितळादेवी नवरात्रोत्सव मंडळ, प्रताप मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांचे प्रबोधन करताना उत्तम दंडिमे बोलत होते.
यावेळी अतुल आचार्य, हरेश तिलोकचंदानी, पंडित अविनाश, पंडित विवेक शास्त्री, दिगंबर रिध्दीवाडे, संतोष गोलांडे, नलिनी देशपांडे, तसेच प्रताप मित्र मंडळाचे बाळासाहेब वाघेरे, प्रशांत सोनवणे, योगेश रसाळ, गणेश वाघेरे, अक्षय बानेकर, उदय नवले, राहुल उणेचा, रोहित रसाळ, अमित शिंदे, दिनेश रासकर, शैलेश बाणेकर, निलेश गिलबिले, ओमकार रसाळ आदींसह यज्ञात सहभागी नागरिक उपस्थित होते.
उत्तम दंडिमे यांनी सांगितले की, यावर्षी आर्य समाजचे संस्थापक महर्षि दयानंद सरस्वती यांच्या जन्मद्विशताब्दी महोत्सव निमित्त देशभर कार्यक्रम होत आहेत. याचा शुभारंभ १२ फेब्रुवारी २०२३ रोजी दिल्ली मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला आहे. महर्षि दयानंद सरस्वती यांचा जन्म गुजरात मध्ये मोरवी संस्थानात टंकारा गावात १२ फेब्रुवारी १८२४ रोजी झाला होता. ते वेदांचे प्रकांड पंडित होते. तपस्वी व सत्यानुगामी आणि स्वराज्याचे पहिले पुरस्कर्ते, महिला उध्दारक, अनाथ व विधवा उध्दारक, जातीभेद निर्मूलक, संस्कृती रक्षक, आद्य क्रांतिकारक, वेदोध्दारक, शास्त्रार्थ महारथी, तर्कतीर्थ, महान योगी, योध्दा सन्यासी आणि अमर बलिदानी होते. त्यांनी लिहिलेला अमर ग्रंथ सत्यार्थप्रकाश मानवाला मार्गदर्शक आहे असेही उत्तम दंडिमे यांनी सांगितले.