शबनम न्युज | वर्धा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांना दिवाळीत १९ कोटी ३९ लाख १९ हजार रुपयांचे वाटप करणे सुरू झाले आहे. पाचवीच्या परीक्षेतून शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या व पुढे सहावी ते आठवीत शिक्षण घेणाऱ्या एकूण ५० हजार ४९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.
तर आठवीच्या परीक्षेतून शिष्यवृत्ती धारक ठरलेल्या व नववी दहावीत शिकणाऱ्या ३२ हजार ५१६ विद्यार्थ्यांना ही वार्षिक शिष्यवृत्ती मिळणार. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर वितरण होत आहे.
वाढीव दराने रक्कम देण्यात येत आहे. यापूर्वी पाचवी साठी एक हजार तर आठवीसाठी दीड हजार मिळत होते.आता पाचवी साठी पाच हजार आणि आठवी साठी साडे सात हजार रुपये मिळणार.एकूण सर्व पात्र विद्यार्थ्यांसाठी ४९ कोटी९४ लाख ५० हजार रुपये अपेक्षित आहे. मात्र, १९ कोटी ३९ लाख १९ हजार रुपयेच प्राप्त झाले आहेत.