शबनम न्युज | अहमदाबाद (वृत्तसंस्था)
आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाचा अंतिम सामना खेळत आहे. दोन्ही संघ दुसऱ्यांदा वर्ल्डकप फायनल मध्ये आमने-सामने आले आहेत. 2003 च्या एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामन्यात कांगारूंनी 125 धावांनी भारतावर विजय मिळवला होता. आता भारताला 20 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला फायनल मध्ये हरवण्याची संधी आहे.
भारतीय संघ चौथ्यांदा विश्वचषकाचा अंतिम सामना खेळत आहे. यापूर्वी भारताने 1983, 2003 आणि 2011 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघ आठव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने संघाने 7 पैकी 5 फायनल जिंकले आहेत.
ऑस्ट्रेलिया गेल्या 27 वर्षापासून वर्ल्डकप फायनल मध्ये हरलेला नाही. या संघाने गेल्या 24 वर्षातील सर्व फायनल जिंकल्या आहेत. फायनल मध्ये ऑस्ट्रेलियाचा शेवटचा पराभव 1996 मध्ये श्रीलंके विरुद्ध झाला होता.